श्यामची आईहे पुस्तक भाग 1


श्यामची आईहे पुस्तक सुंदर आणि सुरस असून , त्यात साने गुरूजींनी हृदयातील सारा जिव्हाळा ओतलेला आहे . मातेबद्दल असणाच्या प्रेम , भक्ति व कृतज्ञता अशा अपार भावना । ' श्यामची आई ' या पुस्तकात साने गुरुजींनी मांडलेल्या आहेत . हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल . हे पुस्तक ही एक सत्यकथा आहे . नाशिक तुरूंगात साने गुरूजींनी या कथा लिहिण्यास ९ फेब्रुवारी १९३३ ( गुरुवार ) रोजी सुरुवात केली आणि १३ फेब्रुवारी १९३३ ( सोमवार ) पहाटे त्या लिहून संपविल्या . मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्यवर्ती सूत्र आहे . त्याबरोबरच सुसंस्कृत व बाळबोध घराण्यातील साध्या , सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे .
पुष्कळ वेळा मनष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो . त्याचे पढचे बरे - वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते . त्याच्या ब - यावाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो . पाळण्यात असतानाच , आईच्या खांद्यावर खेळत असतानाच , पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते . मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठांवर आपले नाव काही काळ नाचणे , असा मी करीत नाही . हिमालयाच्या द - याखो - यात असे प्रचंड व गगनचुंबी वृक्ष असतील , की ज्यांची नावे जगाला माहीत नाहीत ; रानावनांतील कानाकोप - यात असे एखादे रमणीय व सुगंधी फूल फुललेले असेल , की , ज्याचा पत्ता कोणाला लागलेला नाही . समुद्राच्या पोटात अशी गोलबंद व पाणीदार मोत्ये असतील , की ज्याची जगास वार्ता नाही . पृथ्वीच्या पोटात ता - यांसारखे तेजस्वी हिरे असतील ; परंतु मानवजातीस त्यांचे अद्यापि दर्शन नाही . वर अनंत आकाशात असे अनंत तारे असतील , की जे पल्लेदार दुर्बिणीतूनही अजून दिसले नाहीत . मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे , असा मी करीत नाही . मी निर्दोष होत आहे . हळूहळू उन्नत होत आहे , ही ज्याला जाणीव आहे , तो मोठाच होत आहे . मोठा होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करितात . आईबापांकडून मिळालेली ही ईश्वरी देणगी होय . मायबापच कळत वा नकळत मुलाला लहान किंवा मोठा करीत असतात .
मनुष्य जन्मतो त्याच्यापूर्वीच त्याचे शिक्षण सुरू झालेले असते . आईच्या पोटात गर्भरूपाने जीव आला . त्याच्यापूर्वीच त्याच्या शिक्षणाची तयारी झालेली असते . गर्भधारणेपूर्वीच आईबापांनी आपापल्या जीवनात जे विचार केले असतील , ज्या भावना हृदयात खेळविल्या असतील , जी कर्मे केली असतील , त्या सर्वांतून नवबालकाच्या शिक्षणाचीच पुस्तके तयार केली जात असतात . जगात फक्त आईबापच शिकवतात , असे नाही ; आजूबाजूचे सारे जग , सारी सजीव निर्जीव सृष्टी शिकवीत असते ; परंतु या आजूबाजूच्या सृष्टीतून काय शिकावे , हे आईबापच शिकवितात . मुलांच्या शिक्षणात जास्तीत जास्त वाटा आईबापांचा असतो व त्यातही आईचा अधिक . आईच्या पोटातच मुळी जीव राहिला ; आईशी एकरूप होऊनच जीव बाहेर पडला ; जणू तिचाच होऊन बाहेर आला . बाहेर आल्यावरही आईच्याच सान्निध्यात त्याचा लहानपणी तरी । बहुतेक वेळ जातो . तो आईजवळ हसतो ; आईजवळ रडतो ; आईजवळ खातोपितो ; आईजवळ खेळतो - खिदळतो , झोपतो , झोपी जातो , आईजवळ त्याची ऊठबस सुरू असते . म्हणूनच खरी शिक्षणदात्री आईच होय . आई देह देते व मनही देते . जन्मास घालणारी तीच व ज्ञान देणारीही तीच . लहानपणी मुलावर जे परिणाम होतात , ते दृढतम असतात . लहानपणी मुलाचे मन रिकामे असते . भिका - याला , चार दिवसांच्या उपाश्याला , ज्याप्रमाणे मिळेल तो बरावाईट घास घेण्याची धडपड करावीशी वाटते , त्याप्रमाणेच बालकाचे रिकामे मन जे जे आजूबाजूला असेल , त्याची निवडानिवड न करता अधाशासारखे भराभर त्याचा संग्रह करीत असते . अगदी लहान दोनचार महिन्यांच्या मुलाला जर बाहेर अंगणात ठेवले , तर आजूबाजूच्या हिरव्या हिरव्या झाडामाडांचा त्याच्या मनावर , त्याच्या शरीरावर इतका परिणाम होतो , की त्याच्या मनासही रंग येतो , असे बायका म्हणतात . याचा अर्थ एवढाच , की लहानपणी मन फारच संस्कारक्षम असते . मातीसारखे , मेणासारखे ते असते . द्यावा तो आकार त्याला मिळेल . आईने तेलकट खाल्ले , तर मुलाला खोकला होईल , आईने उसाचा रस , आंब्याचा रस खाल्ला , तर मुलाला थंडी होईल , त्याप्रमाणे आईने मुलादेखत आदळआपट केली , भांडणतंडण केले , तर मुलाच्या मनास खोकला होईल . परंतु ही गोष्ट आया विसरतात . आईचे बोलणे , चालणे , हसणेसवरणे , मुलाच्या आसमंतात होणा - या आईच्या सर्व क्रीया , म्हणजे मुलाच्या मनाचे , बुध्दीचे , हृदयाचे दूध होय . मुलाला दूध पाजताना आईचे डोळे मत्सराने लाल झालेले असतील , तर मुलाचे मनही रागीट होईल 
.
अशा प्रकारे मुलाचे शिक्षण हे मातेवर , पित्यावर , आप्तेष्टांवर , सभोवतालच्या सर्व सजीव - निर्जीव सृष्टीवर अवलंबून आहे . मुलांच्या समीप फार जपून वागावे . वातावरण स्वच्छ राखावे . सूर्यचंद्रांना माहीत असो वा नसो ; त्यांच्या किरणांनी कमळे फुलतात , ही गोष्ट खरी . आईबापांना व इतर लोकांना माहीत असो वा नसो ; त्यांच्या कृत्यांनी मुलांच्या जीवनकळया फुलत असतात , हे खरे . सूर्यचंद्रांच्या किरणांप्रमाणे मनुष्याचे मनुष्याचे व्यवहार , आई - बापांची कृत्ये , स्वच्छ , सतेज व तमोहीन अशी असतील , तर मुलांची मने कमळांप्रमाणे रसपूर्ण , सुगंधी , रमणीय व पवित्र अशी फुलतील ; नाहीतर ती किडींनी खाल्लेली , रोगट , फिक्कट , रंगहीन व पावित्र्यहीन अशी होतील . मुलांचे जीवन बिघडविणे यासारखे पाप नाही . स्वच्छ झ - याचे पाणी घाण करणे यासारखे पाप नाही . मुलांजवळ राहणा - यांनी ही गोष्ट सदैव लक्षात ठेवावी . वसिष्ठऋषी वेदामध्ये वरूणदेवाला म्हणतात , " हे वरूणदेवा ! माझ्या हातून जर काही वाईट झाले असेल , तर त्याबद्दल माझ्या वडील मंडळीस जबाबदार धर ! " अस्ति ज्याजान् कनीयस उपारे " कनिष्ठाच्या जवळ ज्येष्ठ असतो . या ज्येष्ठाने आपली जोखीम ओळखून वागले पाहिजे . आईबापांनी , शेजा - यांनी , गुरूजींनी सर्वांनी लहान मुलांचा विकास सदैव डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्याजवळ वागावे . श्यामला त्याच्या भाग्याने थोर माता मिळाली होती . दररोज तो आपल्या आईला मनात धन्यवाद देत असे . कधी कधी चार अश्रूनी तिचे तर्पण करीत असे . आश्रमातील मित्र त्याची जीवनकथा पुष्कळ वेळा विचारीत ; परंतु श्याम सांगत नसे . आश्रमातील इतर सारे सवंगडी आपापल्या जीवनातील नानाविध बरेवाईट अनुभव परस्परांना सांगत असत . आपल्या सोबत्यांच्या जीवनकथा ऐकताना कधी कधी एकाएकी श्यामचे डोळे भरून येत असत . त्या वेळी स्वत : च्या जीवनातील तसल्याच स्मृती त्याला येत असत . ' श्याम , तू सर्वांचे ऐकून घेतोस ; पण स्वत : चे मात्र का , रे , काहीच सांगत नाहीस ? ' असे त्याचे मित्र पुष्कळदा त्याला म्हणत . एके दिवशी असाच आग्रह चालला होता . श्याम भरल्या आवाजाने म्हणाला , ' माझ्या स्वत : च्या पूर्वजीवनाची स्मृती करणे मला फार शोकदायक वाटते , कारण गतायुष्यातील चांगल्याबरोबर वाईट आठवते , पुण्याबरोबर पापही आठवते . मी माझ्या एकेका दुर्गुणाला खोल खड्डे खणून । गाडून टाकीत आहे . ही पिशाच्चे पुन्हा वर उठून माझ्या मानगुटीस बसू नयेत , म्हणून माझी ही धडपड आहे . जीवन निर्दोष व निर्मळ व्हावे , ही माझी तळमळ , हेच माझे ध्येय , हेच माझे स्वप्न ! कशाला मागची सारी आठवण मला करायला लावता ? "
" केव्हा होईल जीवन माझे निर्मळ ता - यापरी । हुरहुर हीच एक अंतरी । ' " परंतु आम्हां चांगल्याच गोष्टी सांगा . चांगल्या गोष्टींचे चिंतन केल्याने मनुष्य चांगला होत जातो , अ नेहमी म्हणता . लहान गोविंदा म्हणाला , " परंतु आपण चांगलेच आठवले व ते सांगितले , तर आपण निर्दोष आहोत , असा अहंकारही जडावयाचा . भिका म्हणाला . श्याम गंभीर होऊन म्हणाला , ' मनुष्याला स्वत : चे अध : पतन सांगावयास जशी लाज वाटते , त्याप्रमाणे आपण कसे चढलो व चढत आहोत , हे सांगावयासही लाज वाटते . आत्मप्रौढीचा शब्दही माझ्या तोंडून बाहेर न येवो , अशी देवाला माझी प्रार्थना असते . ' नारायण जरा हसत म्हणाला , ' मी निरहंकारी आहे . याचाच एखादे वेळेस अहंकार व्हावयाचा , मी आत्मप्रौढी सांगत नाही , असे म्हणण्यातच आत्मप्रौढी येऊन जावयाची ! ' श्याम म्हणाला , ' या जगात जपावे तेवढे थोडेच . ठायी ठायी मोहक मोह आहेत . कोसळावयास कडे आहेत . शक्यतोवर जपावे , यत्न करावे , प्रामाणिकपणे झटावे , आत्मवंचना करू नये . अहंकाराचे रूप फार सूक्ष्म असते . सदैव सावध राहिले पाहिजे . श्यामचा प्रेमळ मित्र राम म्हणाला , ' आपण का एकमेकांस परके आहोत ? तू व आम्ही अद्यापि एकरूप नाही का झालो ? आपल्या आश्रमात आता खाजगी असे काहीएक नाही . आपण एक . जे आहे , ते सर्वांच्या मालकीचे , तू आपली अनुभवसंपत्ती का बरे चोरून ठेवतोस ? तुझ्याजवळ वादविवाद आम्हांला करावयाचा नाही . आम्हाला सांगण्यात कसली आहे प्रौढी ! कसला आहे गर्व ? तुझ्या जीवनात ही माधुरी , ही सरलता , ही कोमलता , हे प्रेम , हे गोड हसणे , ही सेवावृत्ती , ही निरहंकारिता कोणतेही काम करण्यास लाज न वाटण्याची वृत्ती हे सारे कोठून आले ? ते सांग . आम्ही आजा - याची शुश्रूषा करतो , तूही करतोस ; परंतु तू आजा - याची आई होतोस , आम्हांला का होता येत नाही ? तू आपल्या नुसत्या गोड हसण्याने दुस - याला आपलासा करतोस ; परंतु त्याच्याजवळ चार चार तास बसून , बोलूनही त्याचे मन अम्हांला ओढून का घेता येत नाही ? सांग , ही जादू कोठून पैदा केलीस ? सांग , तुझ्या जीवनात हा सुगंध कोणी मिसळला ? ही कस्तूरी कोणी ओतली ? श्याम , व - हाडातील एक दंतकथा तुला माहीत आहे का ? एकदा व हाडात एका श्रीमंत व्यापा - याचे टोलेजंग घर बांधले जात होते . त्या वेळेस एक नेपाळी कस्तूरीविक्या तेथे कस्तूरी विकावयास आला . श्रीमंत व्यापा - याने त्या कस्तूरीविक्यास भाव विचारला . तो कस्तूरीविक्या तिरस्काराने म्हणाला , तुम्ही दक्षिणेतील गरीब लोक काय घेणार कस्तूरी ? पुण्याला जाऊन काही खपली , तर पाहावयाचे ! ' त्या श्रीमंत व्यापा - यास राग आला . तो म्हणाला , ' तुझी सारी कस्तूरी मोज . त्या मातीच्या गा - यात मिसळून देतो . कस्तूरीच्या भिंती दक्षिणेतील लोक बांधतात असे , उत्तरेस जाऊन सांग . त्या व्यापा - याने सारी कस्तूरी खरेदी केली व गा - यात मिसळून दिली . व - हाडातील त्या घराच्या भिंतींना अजून कस्तूरीचा वास येतो , असे सांगतात . श्याम , तुझ्या जीवनाच्या भिंती जेव्हा बांधल्या जात होत्या , त्या वेळेस कोणी रे , तिथे कस्तूरी ओतली ? आमच्या जीवनाला ना वास , ना रूप , ना गंध ! तुझ्या जीवनाला हा वास कोठून आला ? हा रंग कोणी दिला , सांग .
श्यामच्याने आता राहवेना . तो गंभीरपणे व गहिवराने म्हणाला , ' माझ्या आईचे हे देणे . गड्यांनो ! माझ्यात जे काही चांगले आहे , ते माझ्या आईचे आहे . आई माझा गुरू , आई माझी कल्पतरू , तिने मला काय काय तरी दिले ! तिने मला काय दिले नाही ? सारे काही दिले ! प्रेमळपणे बघावयास , प्रेमळ बोलावयास तिनेच मला शिकविले . मनुष्यावर नव्हे , तर गाईगुरांवर , फुलांपाखरांवर , झाडामाडांवर , प्रेम करावयास तिनेच शिकविले . अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्य तो आपले काम उत्कृष्टपणे करीत राहणे , हे मला तिनेच शिकविले . कोंड्याचा मांडा करून कसा खावा व दारिद्रयातही स्वत्व व सत्त्व न गमविता कसे राहावे , हे तिनेच मला शिकविले . आईने जे शिकविले , त्याचा परार्धाशही माझ्या जीवनात मला प्रकट करता आला नाही . अजून माझ्या मनोभूमीत बीज फुगत आहे . त्यातून भरदार जोमदार अंकुर केंव्हा बाहेर येईल , तो येवो . माझ्या आईनेच जीवनात अत्तर ओतले . मी मनात म्हणत असतो , " मदंतरंगी करूनी निवास सुवास देई मम जीवनास " तीच वास देणारी , रंग देणारी , मी खरोखर कोणी नाही . सारे तिचे , त्या थोर माउलीचे . सारी माझी आई . आई ! आई ! ! ! " असे म्हणता म्हणता श्यामला गहिवरून आले . त्याच्या डोळ्यातून घळघळा अश्रुधारा गळू लागल्या . भावनांनी त्यांचे ओठ , त्यांचे हात , हाताची बोटे थरथरू लागली . थोडा वेळ सारेच शांत होते . ता - यांची थोर शांती तेथे पसरली होती . नंतर भावनापूर थोडा ओसरला व श्याम म्हणाला , ' गड्यांनो ! माझे असे काही सांगण्यासारखे नाही ; परंतु माझी आई कशी होती , ते मी तुम्हाला सांगेन . आईचे गुणगान करून हे ओठ पवित्र करीन . आईच्या आठवतील , त्या त्या गोष्टी सांगेन . तिच्या स्मृती आळवीन . रोज रात्री एकेक प्रसंग मी सांगत जाईन . चालेल का ? " " हो , चालेल ! ' सारे म्हणाले . राम म्हणाला , ' देवाला मागितला एक डोळा , देवाने दिले दोन ! " गोविंदा म्हणाला , ' रोजच सुधारस प्यावयास मिळणार . रोजच पावनगंगेत डुंबावयास मिळणार ! "

Comments